- जिवती शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांचा आरोप
गडचांदुर -
अतिदुर्गम व अशिक्षित समजला जाणारा जिवती तालुक्यातील टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत गावापासून ते श्री भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम २५ जून २०२१ ला पूर्ण झाले मात्र एकाच महिन्यात पांदन रस्ता चोरीला गेला. यामुळे गाव विकासाला चालना मिळत नाही आहे असे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसून येत आहे.
शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते श्री भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकामाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची. ग्राम विकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत टेकामांडवा येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.