- तेलबियावर्गीय पिकांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भूईमुगाची लागवड केली. या पिकाकडून आशा वाढल्या असताना भूईमुगाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे....
![]() |
यवतमाळ - पुसद तालुक्यातील पिंपळगाव येथील महेश चौधरी व निलेश चौधरी या शेतकऱ्यांच्या शेतातील भूईमुगाच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. |
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
भूईमुगाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे सर्वेक्षण करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी व शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. यातच करोनाचे संकट वाढल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. तेलवर्गीय पिकांना अधिक भाव मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या. पिकही बहरून आले. पण, भुईमुंग पीकाला शेंगाच लागल्या नाही. सततच्या नापीकी मुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार ने शेतकर्यांकडे लक्ष द्यावे. कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे सर्वेक्षण करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.