Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरोनाने जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी हजारी ओलांडली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
1010 पॉझिटिव्ह ; 14 मृत्यू गत 24 तासात 335 कोरोनामुक्त ॲक्टीव पॉझिटिव्ह 6549 आतापर्यंत 28,448 जणांची कोरोनावर मात श्रावण कुमार - आमचा विदर्भ...

  • 1010 पॉझिटिव्ह ; 14 मृत्यू
  • गत 24 तासात 335 कोरोनामुक्त
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 6549
  • आतापर्यंत 28,448 जणांची कोरोनावर मात

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 13 एप्रिल -

जिल्ह्यात मागील 24 तासात 335 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1010 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 14 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 35 हजार 513 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 448 झाली आहे. सध्या 6549 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 8 हजार 868 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 67 हजार 727 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या छत्रपती नगर तुकुम येथील 56 वर्षीय महिला, घुटकाला वार्ड  येथील 65 वर्षीय महिला, ऊर्जानगर येथील 75 वर्षीय पुरुष, दादमहल वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष व पाण्याच्या टाकीजवळ राम नगर येथील 48 वर्षीय पुरुष, कोरिनाल तालुका चिमूर येथील 56 वर्षीय पुरुष, चिमूर शहरातील 65 वर्षीय पुरुष, राजुरा येथील 53 वर्षीय पुरुष, राजोली ता. मूल येथील 72 वर्षे पुरुष, वणी यवतमाळ येथील 69 वर्षीय पुरुष, राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील 60 वर्षीय महिला, मूल येथील 75 वर्षीय पुरुष, लोधिखेडा, वरोरा येथील 70 वर्षीय महिला, चिमूर येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 516 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 471, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 20, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1010 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 362, चंद्रपूर तालुका 112,  बल्लारपूर 110, भद्रावती 32, ब्रम्हपुरी 81, नागभिड 38, सिंदेवाही 29, मूल 23, सावली 29, पोंभुर्णा चार, गोंडपिपरी 12, राजूरा 54, चिमूर 54, वरोरा 39, कोरपना 10 व इतर ठिकाणच्या 21 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top