Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी - आबिद अली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बोंड अळी, लाल्यारोगाने शेतकऱ्यांवर संकट शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - चालू हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल या...
  • बोंड अळी, लाल्यारोगाने शेतकऱ्यांवर संकट
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चालू हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल या आशेने बळीराजा सतत गेल्या चार वर्षापासून अतिवृष्टी बोंड अळी रोगाने संकट झेलत असताना यावर्षी आर्थिक संकट असतानाही कर्ज उभारून मोठ्या आशेने या पिकाची लागवड केली. ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापूस पिकाची नासाडी झाली. त्यातच आता लाल्यारोग व बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने शेतकरी ताटात आलेला घास ही रवल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये अतिवृष्टी जोरदार पावसाने झोडपून काढले तर विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन हे पीक चांगल्या परस्थितीत असताना झालेल्या पावसामुळे लाल्या व बोंड अळीने कहर केल्यामुळे शेतकरी चिंतातूर अवस्थेत आहेत. शासनाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात केली मात्र विदर्भातील अनेक कापूस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली आहे.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top