- शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही
- कोरपना तालुका मराठी पत्रकार संघ तर्फे स्वागत
गडचांदूर -
गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांचे स्थानांतर भद्रावती येथे झाले असल्याने त्याच्या रिक्त जागी ठाणेदारीपदी सत्यजित आमले यांनी पदभार सांभाळला आहेत. कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सत्यजित आमले येथे रूजू होण्यापूर्वी चंद्रपूर येथे कार्यरत होते. आमले यांनी घुघुस येथे सुद्धा उत्कृष्ट कार्य केले आहेत. कर्तव्यदक्ष ठाणेदार म्हणून ते प्रचलित आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक आमले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की 'गडचांदूर शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहणार आहे.'
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.