- नागपूर प्रशासनाने करोनाच्या तिसऱ्या लाटेकरिता सज्ज होण्यासाठी पाऊले उचलावीत
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आदेश
- प्रशासनाने ठिकठिकाणी बालरोग उपचार विभाग
- जंबो इस्पितळ व अस्थाई इस्पितळांची निर्मिती करावी - नागपूर खंडपीठ
कोरोनासंदर्भात न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करवून घेतली आहे. या याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले. यावेळी न्यायालयाने प्रशासनाला केवळ नागपूर शहरातच नाही तर जिल्हा, तहसील आणि ग्राम पंचायत स्तरावरसुद्धा सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, सध्या शहरात पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र, सिलिंडरची कमतरता आहे. यावर उच्च न्यायालयाने उद्योजक आणि कंपन्यांना सिलिंडर अधिग्रहित करण्यास सांगितले आहे. तसेच सरकार आणि उद्योजकांकडून मिळणाऱ्या निधीतून ५ कोटी रुपये हे मेयो, मेडीकल आणि एम्समध्ये ऑक्सिजन प्लान्ट स्थापन करण्यासाठी आरक्षित ठेवावेत व त्यासाठी आवश्यक ती निवीदा प्रक्रिया राबवावी असे आदेश न्यायालयाने दिलेत. तसेच या विषाणुच्या म्युटेशन आणि प्लाजमावर शहरातील नीरी संशोधन करीत असल्याचीही माहिती यावेळी न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने यावर समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणी अँड.श्रीरंग भांडारकर यांनी न्यायालयमित्र म्हणून, मनपाकडून अँड.सुधीर पुराणिक, केंद्र सरकारकडून अँड.उल्हास औरंगाबादकर, मध्यस्थी अर्जदारांकडून अँड.एम. अनिलकुमार, अँड.तुषार मंडलेकर काम बघत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.