- तीन बाधितांच्या मृत्यू ; 353 नव्याने पॉझिटिव्ह
- 24 तासात 120 जणांनी केली कोरोनावर मात
- 2291 बाधितांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 390 झाली आहे. सध्या 2291 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 76 हजार 112 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 44 हजार 375 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये वार्ड नं. 16, मूल, येथील 67 वर्षीय पुरूष, रामनगर, चंद्रपूर येथील 38 वर्षीय पुरूष व महाडोली वरोरा येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 389, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 353 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 102, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपुर 11, भद्रावती 37, ब्रम्हपुरी तीन, नागभीड दोन, सिंदेवाही सात, मूल 13, सावली सहा, गोंडपिपरी एक, राजूरा 10, चिमूर 36, वरोरा 74, कोरपना 21, जीवती तीन व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.