- ९० टक्केहुन अधिक बसफेऱ्या रद्द
- शाळकरी मुलांना घरी पाठविण्याकरिता महामंडळ कर्मचाऱ्यांची झाली दमछाक
राजुरा -
एसटी महामंडळाच्या राजुरा आगाराचे डिझेल संपल्यामुळे अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहे. शाळकरी मुलांना परत घरी पाठविण्याकरिता मात्र आज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. शिल्लक असलेले डिझेल व बसफेऱ्या पूर्ण करून आलेल्या बसेसच्या टंकीमधून डिझेल काढून अतिदुर्गम नगरळा, जिवती, पुडियाल मोहदा, धिडशी व अन्य काही गावातील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. डिझेलअभावी बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवांश्यासह एसटी महामंडळालाही फटका बसला आहे. अशी नामुष्की का उद्धभवली यावर एसटी महामंडळाने गंभीरपूर्वक विचार करून योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.