- भंडाऱ्यात धगधगल्या 12 चिता
- स्मशानशेड अपुरे पडल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार
- जिल्ह्यात 448 जणांनी गमावले जीव
- मृतांची वाढती आकडेवारी चिंताजनक
कर्मचाऱ्यांवर वाढला ताण
मागील १३ दिवसांत कोरोनामुळे १०५ जणांनी आपला जीव गमावला आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत टाकण्यापासून ते स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेने १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिनाभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे.
नातेवाइकांचा एकमेकांना धीर
कुटुंबातील कर्त्या माणसांना, कुटुंबाचा आधारवड असलेल्या वृद्धांना या कोरोनाने हिरावून नेले आहे. मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्यांचे शेवटचे दर्शनही दुर्लभ झाले आहे.े मृत पावलेल्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देत पाणावलेल्या डोळ्यांनी नातेवाइकांना एकमेकांना धीर द्यावा लागत आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबातील आप्तेष्ट किमान ५०० फूट दूर अंतरावरून त्याचे शेवटचे दर्शन घेत मोठ्या अंत:करणाने घराकडे परतताना दिसत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.