आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती (दि. १० मे २०२५) -
तालुक्यातील सारंगापूर येथील शेतकरी बाबुराव चव्हाण यांच्या बैलावर विज कोसळल्याने बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे विजांच्या कडकडाटात बैल चरण्यासाठी रानात असताना त्याच्यावर विज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
शेतकरी बाबुराव चव्हाण यांचे हे बैल त्यांच्या शेतीसाठी महत्त्वाचे होते. पेरणीपूर्व हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीकामासाठी अत्यावश्यक असलेल्या या बैलामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.