आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि.०२ जुलै २०२४) -
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी डीप कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या सास्ती येथील तरुणाचा सास्ती-बल्लारपूर मार्गवरील वर्धा नदीच्या पुलावर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक तरुणाचे नाव सचिन अशोकराव पत्तीवार (वय अंदाजे ४५) असून तो काही दिवसापूर्वीपासून चंद्रपूर येथे राहात होता आणि तिथून ड्युटी करिता जाणे येणे करत होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी ड्युटीला येताना समोर गाडी असल्याचे पाहून पुलावरील खड्डा चुकविताना तोल गेल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला व अखेर घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. सचिन आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता, त्याचे मागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा आहे.
घटनेची माहिती मिळताच सास्ती-बल्लारपूर वासियांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. सचिन हा स्वभावाने अतिशय मनमिळाऊ असल्याने गावात व त्याचे परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अचानक जाण्याने आप्तेष्ट अत्यंत भावुक झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.