Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पांढरपौनी येथील आर्यन कोल वाशरीजच्या विरोधात कामगारांचे काम बंद आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आठ दिवसात जुन्या कामगारांना कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन माजी आमदार अँड संजय धोटे यांचा इशारा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - आर्...
  • आठ दिवसात जुन्या कामगारांना कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन
  • माजी आमदार अँड संजय धोटे यांचा इशारा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आर्यन कोल वाशरीज काही वर्षांपासून बंद पडली होती, मागील काही महिन्या अगोदर ही कंपनी पूर्वरत सुरु करण्यात आली. परंतु जुन्या कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही तसेच कंपनीच्या विविध समस्या संदर्भात पांढरपौनी येथील आर्यन कोल वाशरीज विरोधात राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली कंपनी विरोधात काम बंद करण्यात आले. यावेळी कामगारांच्या विविध मागण्या तसेच कंपनी तर्फे कामगारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा मिळाव्यात याचीही मागणी करण्यात आली. 
यावेळी बोलतांना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की आर्यन कोल वाशरीज ही कंपनी कामगारांचे शोषण करत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचे शोषण खपवल्या जाणार नाही. जुन्या कामगारांना आठ दिवसाच्या आत कामावर घ्या अन्यथा भाजपचे वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. कामगाराना मिळणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून तसेच कंपनीचे रसायन युक्त पाणी हे नाल्यामध्ये मिसळत असल्याने येथील वातावरण दूषित होत आहे. कंपनीने नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडणे थांबवावे अशीही मागणी करण्यात आली. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या सोबत याविषयी बैठक लावण्यात येणार आहे. कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून कामगारांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केली. 
आंदोलना प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय मुसळे, भाजप नेते निलेश ताजने, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, नगर सेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे, भाजपचे संदीप गायकवाड, महादेव तपासे, संदीप शेरकी, संदीप पारखी, गणेश रेकलवार इत्यादींनीही मार्गदर्शन केले. 
कंपनी विरोधात काम बंद आंदोलनप्रसंगी केलेल्या मागण्या, कंपनीतील जुन्या कामगारांना पूर्वरत कामगार घेणे, कामगारांना नियमानुसार सोयी सुविधा पुरवणे, कामगारांना दुपारच्या वेळी जेवणाची वेळ देण्यात यावी, कामगाराकडून कंपनीद्वारा नियमबाह्य लिहून घेण्यात येणारे हमीपत्र त्वरित बंद करावे व कंपनी कामगारांकडून काम करून घ्यावे व कामगारांवरील अन्याय दूर करावा, कंपनीतील कामगार व सुरक्षा रक्षकांची सिनियरिटी कायम ठेण्यात यावी, कामगारांची गरज भासल्यास पांढरपौवणी, मुठरा किंवा खमोना येथील बेरोजगार युवकांना कामावर घ्यावे. मुठरा नाल्यात कंपनीच्या वतीने सोडण्यात येणारे रसायन युक्त पाणी सोडणे बंद करावे. प्रदूषणामुळे परिसरातील शेतीचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी तसेच शासन नियमानुसार पांढरपौणी, मुठरा व खमोना या गावांना CSR फंड देवून विकास काम करावी या सर्व मागण्या घेऊन हे कामबंद आंदोलन करण्यात आले. 
आंदोलनाच्या यशस्वितेकरिता भाजपचे युवा नेते संदीप गायकवाड, भाजयुमो जिल्हा सचिव दिलीप गिरसावळे, आनंदराव वैरागडे, राजेश गिरसावळे, मारोती निब्रड, संतोष मोरे, परमेश्वर वैरागडे, श्रीधर जेऊरकर, नागोराव कवळवळे, रमेश वैरागडे, पुंडलिक जीवतोडे, संतोष जीवतोडे, गणेश वैद्य, सौ कविता उपरे, शंकर मेश्राम, सौ किरण कुळसंगे, सौ सुवर्णा मडचापे, सौ मंगला व्याहळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो महिला-पुरुष व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top