- बँकेकडून पीककर्ज मंजूर होण्यासाठी होतोय विलंब
- विलंबामुळे बळीराजा चिंतातुर
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
खरीप हंगाम जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पीककर्ज घेण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. मात्र पीककर्ज वाटपाच्या मागील साडेसाती वाढतच जात आहे.
काय आहे नेमकी अडचण?
पिक कर्जासाठी कागदपत्रे दिल्या नंतर ही बॅंकेकडून पिक कर्ज मंजूर होण्यासाठी सुट्यांचे दिवस सोडून 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो असे बॅंकेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सतत च्या नापिकी मुळे शेतकर्यांनकडे पैसे नाहीत एकीकडे जुन महीना लागतच आहे पाण्याला लवकरच सुरुवात ही होईल तर दुसरीकडे शेतकरी पीक कर्जाची वाट पाहत आहे. बी-बियाणे, खत घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. बॅंकेने पीक कर्ज प्रकरणे जलद गतीने मंजूर करुन शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावे. अन्यथा नाईलाजाने शेतकऱ्यांना सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन पेरणी करण्याची वेळ येईल अशी चिंता चिंतातुर शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाईलाजास्तव सावकाराकडून कर्ज घेतल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी शेतकरी मायबाप सरकार कडे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.