Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात आजवरचे सर्वात जास्त कोरोना बाधित आढळले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
24 तासात 937 पॉझिटिव्ह ; 11 मृत्यू गत 24 तासात 305 कोरोनामुक्त आतापर्यंत 27,759 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 5278 वाचा सविस्तर.... श...

  • 24 तासात 937 पॉझिटिव्ह ; 11 मृत्यू
  • गत 24 तासात 305 कोरोनामुक्त
  • आतापर्यंत 27,759 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 5278
  • वाचा सविस्तर....
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 11 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 305 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 937 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 11 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 33 हजार 529 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 759 झाली आहे. सध्या 5278 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 608 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 63 हजार 228 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सिंदेवाही येथील 67 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या

ऊर्जानगर येथील 45 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 43 वर्षीय पुरुष व रामनगर येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 29 वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील 51 वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील 50 वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील 55 वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील 42 वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 492 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 448, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 937 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 241, चंद्रपूर तालुका 45, बल्लारपूर 47, भद्रावती 22, ब्रम्हपुरी 56, नागभिड 32, सिंदेवाही 24, मूल नऊ, सावली 47, गोंडपिपरी सहा, राजूरा 37, चिमूर 73, वरोरा 228, कोरपना 50, जीवती सात व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top