- ७ दिवसाच्या आत यावर तोडगा काढा
- तोडगा न निघाल्यास नगरपंचायती समोर महिलांचा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा
सावली शहरात ग्रामिण पाणीपुरवठा व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु मागील पाच सहा महिन्यापासुन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहेत त्यामुळे मुख्य जल वाहिनी आल्याने ती फुटली, तसेच नवीन वाढीव पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. त्याचे पाईप लाईन टाकत असतांना अनेक ठिकाणी जुनी पाईप लाईन फुटत आहे. एवढेच नाही तर नगर पंचायत कडे टी पाईंट चे नकाशा नाहीत त्यामुळे कोणती पाईप लाईन फुटत आहे हे तेथील कर्मचाऱ्यांना माहीत नाही. या सर्वामुळे पाणी पुरवठा बंद आहे व जनतेला विशेषत: महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दोनदा मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दि. ६ एप्रिल ला सुद्धा निवेदन देऊन सात दिवसांच्या आत साधे नळाचा पाणीपुरवठा नियमीत सुरु करण्याची मागणी करण्यात अली आहे. कारण सर्वात जास्त नळ कनेक्शन हे साधे नळाचे आहेत. ७ दिवसाच्या आत यावर तोडगा न काढल्यास चक्क नगरपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १, २ व ३ येथील महिलांनी दिला आहे. निवेदन देतांना धनराज वाळके, यशोदा वनकर, सुरेखा थोरात, वामन देवगडे, भाग्यवान घोनमोडे, सविता सेमस्कार व शेकडो महिला उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.