- जल शुद्धीकरण संयंत्र मागील एक वर्षापासून बंद
कोरपना -
कोरपना तालुक्यात सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या असून, हंडाभर पाण्यासाठीही जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषतः तालुक्याच्या अनेक भागांत पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. मौजा पालगांव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे पालगांव या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथील माइन्स गेट वरुन ४ किमी अंतर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. गावातील पाणी हे पिण्यायोग्य नाही. आणी, येथील ग्रामपंचायती ने लावलेला जल शुद्धीकरण संयंत्र मागील एक वर्षापासून बंद असल्यामुळे नळाला पाणी येत नाही आहे. ग्रामपंचायती मध्ये वारंवार तक्रारी करुन सुद्धा ग्रामपंचायत व तत्सम कार्यालयाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आता तहसिलदार साहेबानी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. एका आठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली न काढल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा गावातील संतप्त महिलांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.