- राजुरा तालुक्यातील डोंगरगांव येथील घटना
उन्हाने आता कडक उष्णता होत आहे. प्रत्येकजण उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी कूलर वापरत आहे. परंतु कूलरमध्ये पाणी भरताना निष्काळजीपणामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. याची प्रचिती आज राजुरा तालुक्यातील डोंगरगांव गावात झाली. विरूर स्टेशन येथून ४ किमी अंतरावर असलेल्या डोंगरगांव येथे आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कुलर मध्ये पाणी टाकत असतांना राजवती उद्धव ताकसांडे वय ३२ करंटला करंट लागला. करंट लागताच गावातील लोकांनी राजवती ला वरुर येथील आशाधाम इस्पितळात नेले, त्यांनी लगेच राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजवती हा घरी एकटाच राहायचा.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.