65 युवकांनी केले रक्तदान
नांदा फाटा युवा मित्र परिवाराचे तर्फे रक्तदान शिबिर आयोजित
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखल्या जातो. युवकांनी समजाच काही देणं लागते या उद्देशाने समाजात सक्रीय राहून समाजकार्य केले पाहिजे. त्याच प्रमाणे रक्तदान सुध्दा काळाजी गरज आहे. आजही रक्तदान करण्यास अनेक युवक पुढे निघत नाही. अश्या रक्तदान शिबिरात युवकांनी हिरहिरीने सहभाग घेऊन रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. ते नांदा फाटा येथे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि सत्कार सोहळ्यात बोलत होते.
नांदा फाटा येथे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नांदा वा नांदाफाटा येथील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. जवळपास 65 युवकांनी रक्तदान केले.
अरुण धोटे पुढे म्हणाले, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान समजल्या जाते. रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचतात याची प्रचिती कोरोना काळात देखील आली. त्यामुळे युवकांनी रक्तदानास पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. प्रसंगी माजी सरपंच शामसुंदर राऊत, माजी जिप सदस्य शिवचंद्र काळे, माजी उपसपंच पुरुषोत्तम आस्वले, शिवाजी इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका अलेक्सेंडर डिसुजा, प्रकाश बोरकर, चांगदेव बोडखे, नामदेवराव पाचभाई, डॉ राहुल लांडे, डॉ. राहुल भोयर, बापुराव बोनगिनवार, ठनुजी पाचभाई, गौतम धोटे व कनिक्ष ताकसांडे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेकरिता आकाश बोनगिरवार, चंदू राऊत, रवी बंडीवार सोबतच अनेक युवकांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.