बल्लारपुर -
स्थानिक श्री राम वॉर्डातील रहिवासी देवीदास गोसाई ईटनकर वय 52 वर्ष यांनी आजारपणाला कंटाळून घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. देविदास अनेक महिन्यांपासून आजाराने त्रस्त होते. यामुळे वैतागून यांनी आज पहाटे आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.