राजुरा -
बंजारा समाजाचे थोर संत रामराव बापू महाराज यांनी संत सेवालाल महाराजांचे विचार कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी आजन्म केले. बंजारा समाजाला नवी दिशा आणि बळ देण्याचं काम त्यांनी केले. बंजारा समाजामध्ये रामराव बापू यांचा शब्द अंतिम असे. बंजारा समाजा बरोबरच इतर धर्मीयांमध्येही परमपूज्य रामराव बापू यांचे एक आदराचे स्थान आहे. यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. केंद्र सरकारने रामराव बापू यांचा पद्मभूषण पुरस्कारांने गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे. बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर, यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वी संतास समस्त भक्तगण मुकले आहेत. त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य जगाच्या कल्याणासाठी सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यातील शेवगाव येथे संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी माजी आमदार एड. संजय धोटे, सद्गुरू प्रेमसिंग महाराज, नगराध्यक्ष अरुण धोटे, मोतीलाल महाराज या सर्वांच्या हस्ते परमपूज्य डॉ. रामराव बापू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी सुरेश केंद्रे, गोदावरी केंद्रे जि.प. सदस्य, प्रेमदास राठोड, प्रलाद राठोड, शंकर नाईक, बापुलाल महाराज, बंडू राठोड, भिमराव पवार, देविदास साबणे, शबिर मामु, दाजीबा राठोड, आनंदराव राठोड, ताजुद्दिन शेख, शबीर भाई, बंजारा समाजातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.