- देशाच्या नावावर नवा विक्रम
- भारतात सर्वात कमी 85 दिवसात 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली लस
- शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले
शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले की, केंद्र आणि रराज्यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भारतातील डेथ रेट जगातील सर्वात कमी (1.28%) आहे.
भारताने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू केले होते. दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता. यामध्ये 45 पेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात आली. यानंतर 2 एप्रिलपासून सुरू झालेल्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच लोकांना लसी देण्यात आल्या.
सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. शनिवारी संपूर्ण देशात 1.45 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. महामारी सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.