- पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने शेतकऱ्यांत धाकधूक
- गडचांदुर, कोरपना आवारपुर वरून भोयेगांव मार्गे चंद्रपूर घूग्गुस कडे जाणारे रोड बंद
गडचांदूर -
मागिल दोन तीन दिवसापासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले भर भरून वाहू लागल्याने गडचांदूर - घुग्गुस रोडवरील भोयेगाव पुलावरून पाणी वाहू लागले आहे. सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने भोयगाव - धानोरा पूल पाण्याखाली आल्याने रात्रीपासून वाहतूक बंद झाल्याची बातमी मिळाली आहे. वाहतूक बंद झाल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी रांग लागली आहे. गडचांदुर, कोरपना आवारपुर वरून भोयेगांव मार्गी चंद्रपूर घूग्गुस कडे जाणाऱ्या लोकांना दुसऱ्या पर्यायी रस्त्या शोधावा लागत आहे. मात्र सतत पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.