Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: प्राणवायू घेऊन पोहचली ऑक्सिजन एक्सप्रेस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागपूर ला मिळाले तीन टँकर आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - कोव्हिडविरुद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वे चालवित असलेली पहिली ऑक्सिजन...

  • नागपूर ला मिळाले तीन टँकर
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
कोव्हिडविरुद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वे चालवित असलेली पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री प्राणवायू घेऊन नागपुरात दाखल झाली.

विशाखापट्टणम स्टील प्लान्ट सायडिंगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या सात टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्स्प्रेस रात्री ८.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर आली. येथे यातील तीन टँकर उतरविण्यात आले व उर्वरित टँकरसह ही एक्स्प्रेस नाशिककडे रवाना झाली. आज, शनिवारी सकाळी ही गाडी नाशिकला पोहोचेल.

नागपुरात आलेल्या ऑक्सिजनचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नागपुरात ऑक्सिजन आल्यानंतरही त्याला विशिष्ट प्रवास करावा लागतो. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रिफिलरच्या माध्यमातून टँकमध्ये टाकले जाते. या टँकमधून मोठ्या सिलिंडर आणि छोट्या सिलिंडरमध्ये हे ऑक्सिजन भरले जाते. त्यानंतर हॉस्पिटलच्या गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

गेल्यावर्षीही लॉकडाउनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली. यातून आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या संकटात गंभीर वैद्यकीय परिस्थितीत उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. यासाठी रेल्वेमार्फत महत्त्वाच्या मार्गांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे.

महाराष्ट्राने घेतला पुढाकार
महाराष्ट्र सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का, याची चाचणी करण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत संपर्क साधला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात हाहाकार उडाला आहे. दररोज करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली होती. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top